Wednesday, April 9, 2008

स्वागत नववर्षाचे

आज गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदा याच दिवशी ब्रह्म्देवाने सृष्टीची रचना केली.ब्रह्मदेवाच्या या कृतीचे स्वागत गुढी उभारुन करतात. ब्रह्मदेवाच्या कर्तृत्वाचे प्रतिक म्हणुन या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हण्तात. १४ वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी श्रीराम अयोध्येला परत आले. त्यांच्या आगमनाच्या आनंदोत्सव गुढी उभारुन साजरा करतात.
या चैत्राचे आणखी एक महत्व म्हणजे हा वसंत ऋतुचा महिना. शिशिराची पानगळ संपून झाडांना, वृक्षांना नवी पालवी फ़ुटते. कोवळ्या पालवीतून निसर्गाची कोमलता आपल्याला वेगळाच आनंद देते आम्रतरुवर मोहोर फ़ुलतो. कोकीळ गोड स्वरात गात असतो.सर्वत्र आल्हाददायक वातावरण असतं.
वर्षप्रतिपदे पासून ९ दिवस जागोजागी रामजन्मोत्सव साजरा करतात. सर्वत्र मंगलमय,भक्तीमय वातावरण असतं.ऋतुबदलाचा हा काळ असल्याने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणुन गुढीपाडव्याला कडुलिंबाची फ़ुलं,पानं,हिंग,गूळ,चिंच व मीठ यांची चटणी करुन सकाळी खातात.सहा रसांच सेवन केलं जात.
आपण सर्व नववर्षाचे स्वागत करुया. हे नविन वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धिचे व आनंदाची प्रगतीचे जावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करु.
Page copy protected against web site content infringement by Copyscape